AUKUS पॅक्ट ... ऑकस करार

ऑकस करार हा ऑस्ट्रेलिया ,इंग्लंड व अमेरिका यांच्या दरम्यान एक सुरक्षा करार होय ज्या अंतर्गत प्रामुख्याने ८ अनु इंधनावर आधारित पानबुडी ऑस्ट्रेलियासाठी निर्माण करण्यात येणार आहे, याशिवाय गुप्तहेर , सायबर ,अंडरवॉटर सिस्टीम या बाबीचा सुद्धा या करारामध्ये समावेश करण्यात आला.
दसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध  समाप्ती नंतर अमेरिके ने सामरिक दृष्टिकोनातून केलेला हा महत्त्वपूर्ण करार होय. इसवी सन 2030 पर्यंत अमेरिका ऑस्ट्रेलिया ला आठ आण्विक पाणबुड्या निर्माण करून देणार आहे व त्याचे तंत्रज्ञान सुद्धा हस्तांतरित करणार आहे. या पाणबुड्या प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया हिंद_ प्रशांत महासागरामध्ये वापरणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाईडन, इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन, ऑस्ट्रेलियाचे स्कॉट मॉरिसन यांनी वर्च्युअल बैठकीमध्ये या कराराची घोषणा केली.
जगात केवळ सहा देशा कडे आण्विक पाणबुड्या आहेत ,त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड ,फ्रान्स, रशिया, चीन व भारत यांचा समावेश होतो. बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सह आण्विक पाणबुड्या ची संख्या अमेरिकेकडे 68 रशियाकडे 29 चीन 12 इंग्लंड 11 फ्रान्स व भारताकडे एक आण्विक पाणबुडी आहे. आण्विक क्षेपणास्त्राने सज्ज अशा पाणबुडीचा विचार करता अमेरिकेकडे 14 फ्रान्स 11 36 इंग्लंड 4 फ्रान्स 4 व भारत एक एवढी संख्या आहे.
परंपरागत इंधनावर चालणाऱ्या पाणबुड्या दीर्घकाळापर्यंत समुद्रात कार्य करू शकत नाहीत पण आण्विक पाणबुडी ही महिनोन्महिने खोल समुद्रात दीर्घ काळा पर्यंत कार्य करण्याची क्षमता त्यांच्यात असल्यामुळे अनेक गुप्त मोहिमेवर व खोल समुद्रात त्या अनेक महिने कार्यरत राहू शकतात हे याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. याशिवाय अण्वस्त्र  क्षमता यात सहजपणे विकसित करता येते जी युद्धात निर्णायक ठरू शकते.
फ्रान्स _ऑस्ट्रेलिया वाद
ऑकस अंतर्गत करार झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने फ्रान्स सोबत 2016 साली केलेला परंपरागत डिझेल इंधनावर आधारित 1२ पाणबुड्या निर्मितीचा 37 अब्ज डॉलरचा करार संपुष्टात आणला त्यामुळे फ्रान्स या कराराचा कडाडून विरोध करत आहे. वॉशिंग्टन आणि कॅनबेरा येथील परकीय वकिलातीतील दूतांना त्यांनी चर्चेसाठी परत बोलावले त्यामुळे फ्रान्स चे संबंध अमेरिका इंग्लंड व ऑस्ट्रेलिया सोबत तणावाचे बनले आहेत. वॉशिंग्टन चा राजदूत परत गेला असला तरी कॅनबेरा चा  राजदूत कधी परतेल याची चिन्हे दिसत नाहीत. फ्रान्सचे १.६५ दशलक्ष लोकसंख्या ही la Reunion,New calendia,Mayotta,french Polynesia y या बेटा समूहामध्ये राहते.आर्थिक करार रद्द होण्यासोबतच ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सच्या परकीय संबंधावर सुद्धा यामुळे विपरीत परिणाम पुढील काळात दिसू शकतो.
  
चीनच्या सागरी वर्चस्वाला लगाम
गेल्या वीस वर्षात चीन जगातील सर्वात मोठी सागरी सैन्य शक्ती म्हणून पुढे आली आहे. हिंद प्रशांत महासागरात त्यांनी आपले वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत.मलेशियाच्या मच्छी मारा पासून ते अमेरिकेच्या युद्धनौकेला रोखण्या पर्यंत, जपानच्या बेटावरील आपले आधिपत्य घोषित करणे, तैवान वर आपला हक्क सांगणे व त्यासाठीच्या निर्माण झालेला तणाव असो की सेनकांकू बेटावर आपला दावा प्रस्थापित करणे असो चीन आपले आक्रमक सागरी धोरण राबवत आहे.
फ्रान्सचे सुद्धा चीनकडे अलीकडे मवाळ धोरण पहावयास मिळते. चीनच्या आक्रमक सागरी धोरणाला अंकुश लावण्यासाठी अमेरिकेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल होय. उत्तर कोरियाने हा करार म्हणजे आण्विक शस्त्रा ची जगतिक स्पर्धा
 पुन्हा वाढवणारा असल्याचे मत व्यक्त केले आहे...
...
दीपक कदम 
प्रमुख आंबेडकरवादी मिशन.

Popular posts from this blog

दीपक कदम यांना मी ' साहेब म्हणतो..... डॉ.भालचंद्र मुणगेकर

T 15 ... कॉलरवाली माताराम वाघीण.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ऐश्वर्या चिकटे या महाराष्ट्रातून पाहिल्या बौद्ध /अनु जाती मुलीची शिक्षणासाठी निवडलातूर येथील ऐश्वर्या आशा सुशील चिकटे या विद्यार्थिनीची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील बौद्ध समाजातील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झालेली ही पहिली मुलगी होय. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीचा पाया शिक्षण असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले. ज्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (१९१६_२१) काळामध्ये अर्थशास्त्राचे सर्वोच्च शिक्षण घेतले त्याच विद्यापीठामध्ये ऐश्वर्या चिकटे ही विद्यार्थिनी Msc economics history या विषयात पदवीत्तर पदवी चे शिक्षण घेण्यासाठी निवडल्या गेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्यंतिक अभिमानाची ची बाब असल्याचे आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दिपक कदम यांनी स्पष्ट केले. मागील पाच वर्षात महाराष्ट्रातून अनुसूचित जातीतून एकही विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकण्यासाठी गेला नाही. विशेषता मुलींचा विचार करता महाराष्ट्रातून अनुसूचित जाती/बौद्ध समाजातून विचार करता ऐश्वर्या ही पहिली मुलगी आहे जी याठिकाणी उच्चशिक्षणासाठी जात आहे ही बाब सर्वांसाठी भूषण होय व मुलींसमोर हा एक आदर्श होय. दीपक कदम यांच्या हस्ते याप्रसंगी ऐश्वर्या चिकटे चा भव्य सत्कार करण्यात आला. सुशील चिकटे हे आज लातूरमध्ये यशस्वी उद्योजक असले तरी अत्यंत विपरित परिस्थितीतून प्रसंगी मोलमजुरी करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे .लातूरमध्ये ते यशस्वी उद्योजक आहेत व सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रियपणे स्वतःचे योगदान देतात.बारावी सायन्स नंतर परंपरागत मेडिकल किंवा इतर क्षेत्रात शिक्षण न घेता दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पुण्यामध्ये अर्थशास्त्राची पदवी संपादित केली आणि आपले ध्येय ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात जाऊन उच्च शिक्षण घेण्याच्या संकल्प केला जो आज पूर्णत्वास येत आहे.सिद्धार्थ नगर लातूर येथे ऐश्वर्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला याप्रसंगी युपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवले सुमित धोत्रे रँक ६६०व निलेश गायकवाड६२९ यांच्या वडिलांचा प्राचार्य श्रीकांत गायकवाड सर व दत्ता हरी धोत्रे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी भंते पन्यानंद, इंजिनीयर शिवाजी सोनकांबळे, प्रा. अविनाश नाईक, लताबाई महादेव चिकटे ,पद्मिनी बाई नामदेव सावंत ,आशा सुशील चिकटे ,मनोरमा संजय चिकटे प्रा. दुष्यंत कठारे, अनिरुद्ध बनसोडे, एडवोकेट सुनील कांबळे, भारत कांबळे सुधाकर कांबळे श्रीकांत गायकवाड, सुकेशनी सरोदे, सिद्धार्थ सोसायटी महिला मंडळातर्फे ललिता गायकवाड, सुमन ढोबळे सुनील श्रंगारे ,अर्चना जाधव ,पंचशीला सुरवसे ,पद्मिनी कांबळे सुदामती भालेराव ,वीर मला गोधने ,तब्बू मीरा मस्के, मीना चिकटे सिद्धांत ,श्रुती अर्चना, इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.