आंबेडकरवादी मिशन  सुमित धोत्रे पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यशस्वी.....दिल्लीआंबेडकरवादी मिशन चा विद्यार्थी सुमित दत्ताहरी धोत्रे हा यु पी एस सी नागरी सेवा २०२० परीक्षेत पहिल्या प्रयत्नात देशात गुणानुक्रमे 660 क्रमांकावर येऊन यशस्वी झाला. लातूरचा निलेश गायकवाड गुणानुक्रमे 629 क्रमांकावर यशस्वी झाला तर दिल्ली येथे mock  इंटरव्यू प्रोग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन तुन देशभरातील बत्तीस विद्यार्थी यशस्वी झाले.नांदेड येथील सुमित दत्ताहरी धोत्रे हा iit खरगपूर येथून इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेतलेला विद्यार्थी आपल्या पहिल्याच प्रयत्नात 660 व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला. मुख्य परीक्षेसाठी मानववंशशास्त्र हा त्याचा विषय होता त्याचे वडील संपादक आहेत तर आई प्राथमिक शिक्षिका आहेत. आंबेडकरवादी मिशन दीपक कदम यांच्या दोन वर्षापासून मार्गदर्शन घेणारा हा विद्यार्थी यशस्वी झाल्याबद्दल नांदेड परिसरामध्ये विद्यार्थी वर्गामध्ये नवीन चैतन्य व प्रेरणा निर्माण झाली. आत्यंतिक विनयपूर्वक व कठोर प्रयत्न करून सुमित मे हे यश प्राप्त केल्याचे  याप्रसंगी दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्यावर्षी आयसीडीएस या पदावर निवड झालेला निलेश गायकवाड लातूर चा विद्यार्थी 629 व्या गुन्हा क्रमांकाने या वर्षी पुन्हा यशस्वी झाला. त्याचे वडील लातूर येथे प्राचार्य पदी कार्यरत आहेत. मुंबई आयआयटीमधून एमटेक मध्ये त्याने आपले शिक्षण घेतले आहे.दिल्ली येथे mock इंटरव्यू प्रोग्राम याअंतर्गत देशपातळीवरील वरीष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी दोन महिन्याचे मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले यामध्ये आंबेडकरवादी मिशन चा सुद्धा सहभाग गेल्या सहा वर्षात असतो, त्याअंतर्गत देशपातळीवरील ३२ विद्यार्थी या वर्षी यूपीसी मध्ये यशस्वी झाल्याचे दीपक कदम यांनी स्पष्ट केले.Sent

Popular posts from this blog

दीपक कदम यांना मी ' साहेब म्हणतो..... डॉ.भालचंद्र मुणगेकर

T 15 ... कॉलरवाली माताराम वाघीण.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ऐश्वर्या चिकटे या महाराष्ट्रातून पाहिल्या बौद्ध /अनु जाती मुलीची शिक्षणासाठी निवडलातूर येथील ऐश्वर्या आशा सुशील चिकटे या विद्यार्थिनीची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील बौद्ध समाजातील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झालेली ही पहिली मुलगी होय. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीचा पाया शिक्षण असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले. ज्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (१९१६_२१) काळामध्ये अर्थशास्त्राचे सर्वोच्च शिक्षण घेतले त्याच विद्यापीठामध्ये ऐश्वर्या चिकटे ही विद्यार्थिनी Msc economics history या विषयात पदवीत्तर पदवी चे शिक्षण घेण्यासाठी निवडल्या गेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्यंतिक अभिमानाची ची बाब असल्याचे आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दिपक कदम यांनी स्पष्ट केले. मागील पाच वर्षात महाराष्ट्रातून अनुसूचित जातीतून एकही विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकण्यासाठी गेला नाही. विशेषता मुलींचा विचार करता महाराष्ट्रातून अनुसूचित जाती/बौद्ध समाजातून विचार करता ऐश्वर्या ही पहिली मुलगी आहे जी याठिकाणी उच्चशिक्षणासाठी जात आहे ही बाब सर्वांसाठी भूषण होय व मुलींसमोर हा एक आदर्श होय. दीपक कदम यांच्या हस्ते याप्रसंगी ऐश्वर्या चिकटे चा भव्य सत्कार करण्यात आला. सुशील चिकटे हे आज लातूरमध्ये यशस्वी उद्योजक असले तरी अत्यंत विपरित परिस्थितीतून प्रसंगी मोलमजुरी करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे .लातूरमध्ये ते यशस्वी उद्योजक आहेत व सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रियपणे स्वतःचे योगदान देतात.बारावी सायन्स नंतर परंपरागत मेडिकल किंवा इतर क्षेत्रात शिक्षण न घेता दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पुण्यामध्ये अर्थशास्त्राची पदवी संपादित केली आणि आपले ध्येय ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात जाऊन उच्च शिक्षण घेण्याच्या संकल्प केला जो आज पूर्णत्वास येत आहे.सिद्धार्थ नगर लातूर येथे ऐश्वर्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला याप्रसंगी युपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवले सुमित धोत्रे रँक ६६०व निलेश गायकवाड६२९ यांच्या वडिलांचा प्राचार्य श्रीकांत गायकवाड सर व दत्ता हरी धोत्रे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी भंते पन्यानंद, इंजिनीयर शिवाजी सोनकांबळे, प्रा. अविनाश नाईक, लताबाई महादेव चिकटे ,पद्मिनी बाई नामदेव सावंत ,आशा सुशील चिकटे ,मनोरमा संजय चिकटे प्रा. दुष्यंत कठारे, अनिरुद्ध बनसोडे, एडवोकेट सुनील कांबळे, भारत कांबळे सुधाकर कांबळे श्रीकांत गायकवाड, सुकेशनी सरोदे, सिद्धार्थ सोसायटी महिला मंडळातर्फे ललिता गायकवाड, सुमन ढोबळे सुनील श्रंगारे ,अर्चना जाधव ,पंचशीला सुरवसे ,पद्मिनी कांबळे सुदामती भालेराव ,वीर मला गोधने ,तब्बू मीरा मस्के, मीना चिकटे सिद्धांत ,श्रुती अर्चना, इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.